एवढ्यात कोठे
स्वप्नांना पंख होते आले..
आणि
एव्हढ्यातच कोठे
आयुष्य हे जगण्याजोगते झाले..
माध्या:नीचा सूर्यही
लगे पश्चिमेकडे गेला
खरच का
आता फार उशीर झाला....
जेव्हा आयुष्य अत्यंत निर्णायक परिस्थितीतून जात असते, ..... जिथे सर्व काही संपत आहे अस वाटते ..... त्यावेळी एक स्वप्न आपल्याला साऱ्या जगाशी लढण्याची शक्ती देऊ शकते आणि विजयी करू शकते .... (Flowers blossomed in the ashes)
जिंकून झालंय... हरून झालंय...
आयुष्याशी लढून झालंय....
विजयाचा जल्लोष करून...
कधी कोलमडून पडून झालंय....
वादळांना सांगा ...
आता फार फरक पडत नाही
न्यायचंय ते त्यांनी नेलंय...
द्यायचंय ते मी दिलंय....
देऊन झालंय...घेऊन झालंय...
आयुष्याशी लढून झालंय...
पूर्ण झाल्यात मनामधल्या,
खूप साऱ्या अभिलाषा....
काळरात्रिंचा अंत करत,
सूर्याचं आरोहण झालंय....
नमुन झालंय... भजून झालंय....
आयुष्याशी लढून झालंय...
मेरे कल वाले मुझसे कल मेरी मुलाकात हुई तो मैंने उससे उसकी "खुशहाली" ...... पूछ ही ली... क्यों की मैं जानता था के वो चाहता था के...