गणितच जुळत नाही
बेरीज वजा गुणाकारात
बाकी काहीच ऊरत नाही
ठेवता किमती सुत्रांमधे
सुत्रच सारी बिघडत जातात
त्रिकोण चौकोण वर्तुळाचे
पायच सदा मोडत राहतात
टक्क्यंमधे अडकला तुका
मरेस्तोवर सुटत नाही....
बारमाही दुष्काळ शेतात
कधीच काही पीकत नाही
स्वप्नांचे खळे मग तो
करत राहतो मळ्यात
नकळत समाजाच देण
फास होऊन येत गळ्यात...!!
No comments:
Post a Comment